16 अक्टूबर हा ताज होटल चा स्थापना दिवस असुन या होटेल ची स्थापना 16अक्टूबर 1993 रोज़ी टाटा ग्रुप द्वारे केली गेली या मागे काय होता खास उद्देश ? समजून घ्या

ताज हॉटेल स्थापना दिन
स्थापना – 16 ऑक्टोबर 1903

टाटा ग्रुपच्या मुंबईतील ताज हॉटेलचा आज स्थापना दिन

टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी इंडियन हॉटेल कंपनीची (I.H.C.L.) स्थापना १८९९ मध्ये केली.
त्यादरम्यान भारतात पाश्चिमात्य धर्तीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा त्यांचा मानस होता. यामागे अनेक दंतकथा सांगितल्या जातात.

त्यातील एक अशी की,
मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती
जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत.
त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेल मध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला.
त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं.

काहींच्या म्हणण्यानुसार टाटांच्या काही मित्रमंडळींनी मुंबईतील तत्कालीन हॉटेल विषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती.
त्यामुळे त्यांनी ताजच्या उभारणीचा निश्चय केला.
या कहाण्यांपेक्षा लोवाट फ्रेझर या टाटा समूहाशी जवळचे संबंध असणाऱ्या जमशेटजीच्या मित्राचं कथन अधिक पटतं.

त्यांच्या मते ही संकल्पना जमशेटजींच्या मनात अनेक वर्ष घोळत होती.
त्यावर त्यांनी अभ्यासही केला होता.
मालकी हक्क वा उत्पन्नाच्या साधनापेक्षा पर्यटनदृष्टय़ा लोकांनी भारत पाहायला यावं, मुंबईच्या सौंदर्यात भर घालेल अशी आलिशान वास्तू निर्माण व्हावी,
हा उद्देश जमशेटजींच्या मनात होता.

16 ऑक्टोबर1903 रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले.
स्वत: जमशेटजींनी लंडन, पॅरिस, बर्लिन, डुसेलडॉर्फ इथून सामान, फर्निचर, अंतर्गत सजावटीच्या कलात्मक वस्तू आणवल्या. हॉटेल ताज मुंबापुरीचा सरताज ठरलं.
तेव्हापासून ताज हॉटेलची साखळी भारतभर पसरत गेली.

भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय बीच रिसॉर्ट गोवा फोर्ट अग्वादा इथं सुरू केलं,
ते 1974 मध्ये ताज हॉटेल समूहानेच.
हिप्पी पर्यटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचे परदेशी पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण असे रूपांतर होण्यात या हॉटेल समूहाचा वाटा मोठा आहे. त्यानंतर याच समूहाने अनेक राजवाडे हॉटेल मध्ये रूपांतरित केले.

उदयपूर लेक पॅलेस त्यातील पहिला राजवाडा ठरला.
भारतीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यतांचा पंचतारांकित साज चढवत ताज हॉटेल समूहाने एकेक शिखर सर केलं.
भारतीय राष्ट्रीय उद्यानातील ताज सफारी असो, ताज विवांता, ताज एक्झॉटिका या साऱ्या हॉटेल्सनी देशीपरदेशी मंडळींना पंचतारांकित अनुभव देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

आज या समूहाच्या हॉटेल्सनी शंभरी गाठली आहे.
त्यातील 84हॉटेल्स भारतभरात सेवा देतात,
तर अमेरिका, लंडन, दक्षिण आफ्रिका, मालदीव, नेपाळ अशा विविध 16 देशांत ताज हॉटेलने आपला झेंडा रोवला आहे.

2010 मध्ये ताज हॉटेल कर्मचारी संख्या तेरा हजार इतकी होती.
2008च्या अतिरेकी हल्ल्याने मुंबई सोबत सारं जग हादरलं;
पण हॉटेल ताजवरील हल्ला काळजावर ओरखडा उमटवणारा होता.
अतिरेक्यांनी या वास्तूची निवडच भारतीयांच्या गौरवावर घाला घालण्यासाठी केली होती.

2010मध्ये या हल्ल्याच्या खुणा तशाच जपत पूर्वीच्या तोऱ्याने ताज पुन्हा उभे राहिले तेव्हा प्रत्येक मुंबईकर,
प्रत्येक भारतीय भरून पावला.
या ब्रॅण्डची गंमत हीच की,
त्याचा अनुभव घेणारे फार कमी; पण अनुभव न घेताही या ब्रॅण्डकडे आशेने, कुतूहलाने, अभिमानाने, मी सुद्धा एकदा इथे

पोहोचेन या निश्चयाने पाहणारे जास्त.
भारतीयांसाठी हा हॉटेल ब्रॅण्ड सोनेरी दुनिये सारखा आहे.

संदर्भ : इंटरनेट/लोकसत्ता

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT