जळगाव भुसावळ हतनूर धरणाचे छत्तीस दरवाजे नाही उघडले असते तर मोठी जगबुड़ी ची भीतिचे वातावरण !

IMG-20190729-WA0206

प्रतिनिधि:-

तापी नदीला पूर विदर्भ तसेच मध्यप्रदेशात तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भुसावळ तालुुक्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण क्षमतेने रविवार रोजी सांयकाळच्या वेळेस उघडण्यात आले आहे .
तापी नदीला पूर आला आहे हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन यांनी दिलेली माहिती अशी की, धरणाच्या १४ दरवाजे पूर्ण तर २२ दरवाजे एक मीटरने उघडले आहे.

७२१३९ क्युमेक्स अर्थात ३० हजार क्यूसेस एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खान्देशातील जळगावसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ तसेच मध्यप्रदेशात पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणी पातळीत तीन मीटरने तर तापी नदीच्या पाणी पातळीत एक मीटरने वाढ झाली आहे.

हतनूर धरणाच्या नदीपात्रात मृत गुरे वाहून आली आहे .
वरणगांव पोलीस स्टेशनचे ए पी .आय बोरसे यांनी धरणाजवळ दोन पोलीसांची नेमणूक केल्याचे कळविले आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT